हक्काचं व्यासपीठ – होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (ISO 9001:2015 प्रमाणित आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन संस्था) संस्थापक अध्यक्ष: श्री. नामदेवराव आयवळे समाजहितासाठी समर्पित एकमेव संस्था! होलार समाजाचा सर्वांगीण विकास साधणे, ही आमची प्रमुख जबाबदारी आणि प्रेरणा आहे. महाराष्ट्रातील समाजाच्या गरजा ओळखून आणि त्यावर योग्य उपाययोजना करत, आमची संस्था समाजाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. जात प्रमाणपत्र व जात वैधता – विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे! उच्च शिक्षण, शासकीय योजना, शिष्यवृत्ती, नोकरी अशा अनेक संधींच्या प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य असते. मात्र, अनेक वेळा तांत्रिक त्रुटी, चुकीची नोंद, किंवा अपूर्ण माहितीमुळे विद्यार्थ्यांना आणि बेरोजगार युवकांना या संधींपासून वंचित रहावं लागतं. जात पडताळणी समितीकडून वारंवार होणारी कागदपत्रांची मागणी दस्तऐवजांमध्ये चुकीच्या जातीची नोंद मानसिक आणि शैक्षणिक हानी या सर्व अडचणी लक्षात घेऊन, आमच्या संस्थेने आतापर्यंत महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य केलं आहे. संस्थेची सेवा: विना मोबदला, सकारात्मक दृष्टीकोन जर आपल्याला जात प्रमाणपत्र मिळवताना किंवा जात पडताळणी प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण येत असेल – तर होलार समाज सामाजिक संस्था आपल्या सोबत आहे! संस्थेकडे लेखी स्वरूपात अर्ज करा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय करून संस्था आपली मदत करेल कोणतीही आर्थिक मागणी नाही – सेवा विना मोबदला होलार समाजासाठी, होलार समाजाबरोबर! होलार समाज सामाजिक संस्था कोणतीही गोष्ट अर्धवट करत नाही. समाजहितासाठी कार्य करत राहणं हेच आमचं ध्येय आहे. आपली साथ – समाजाचा विकास!
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-