होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने दि.19.2.2025 पासून प्रत्येक रविवारी दुपारी तीन ते चार या वेळेत संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबेवाडी पुणे येथे लाईफ कोच/जीवन-मार्गदर्शक विद्यार्थी, समाज बांधवांला त्याचे ध्येय साध्य करण्यासाठी उपक्रम सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार ते ध्येय जीवनक्रम, नातेसंबंध, स्वतःची काळजी आणि इतर बऱ्याच बाबतीतले असू शकते . लाइफ कोच / जीवन-मार्गदर्शक समाज बांधवांला त्यांचे जीवन सुधारण्यासाठी अनेक मार्गांनी मदत करू शकतो उदा. : 1 .उद्दिष्ट ठरवणे : समाज बाधवाला त्यांची उद्दिष्टे ओळखण्यास आणि ते साध्य करण्यासाठी योजना बनविण्यात मदत करणे 2 . वर्तन बदल : समाज बांधवांला त्यांचे वर्तन आणि दृष्टीकोन बदलण्यास मदत करणे 3 .वैयक्तिक प्रगती : समाज बांधवांला त्यांचा आत्मसन्मान आणि स्वत:चे मूल्य सुधारण्यास व वर्धन करण्यात / वाढवण्यात मदत करणे 4 .नातेसंबंध : समाज बांधवांला त्यांचे इतरांशी संबंध सुधारण्यात मदत करणे 5 . जीवनक्रम : समाज बांधवांला त्यांचा जीवनक्रम आणि नोकरीची कामगिरी सुधारण्यास मदत करणे 6 .आरोग्य : समाज बांधवांला त्यांचे शारीरिक आरोग्य, भावनिक / मानसिक कल्याण आणि आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत करणे ............. लाइफ कोच / जीवन-मार्गदर्शक समाज बांधवांला मदत करण्यासाठी विविध तंत्रांचा वापर करतात उदा. 1 . योग्य प्रश्न विचारणे 2 .समाज जे सांगतो त्याची कल्पना करणे / डोळ्यासमोर ते दृश्य पाहणे 3 .समाज बांधवांच्या मुद्यांची पुनर्मांडणी व.पुनर्बांधणी करणे 4 . समाजाच्या वर्तनाचे आकलन त्यानाच करायला लावणे. जीवन-मार्गदर्शन पद्धती : 1 . समोरच्या व्यक्तीला विविध गोष्टिं / जीवनपैलुंबाबत सध्या किती समाधानी आहे ते विचारणे 2 .त्या गोष्टी वा ते जीवनपैलू म्हणजे : आर्थिक, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक, वागणूकसंबंधी, जीवनक्रमसंबंधी वगैरे 3 . त्यातून त्या माणसाचा पंचपदरी आकृतीबंध उलगडेल 4 .तो आकृतीबंध तसाच का आहे ते विचारणे 5 .त्या आकृतीबंधात संख्यात्मक व गुणात्मक सुधारणा कशी करता येईल ते विचारणे 6 .सुधारणेसंबंधी विविध रण(व्यूह)नीती शोधणे 7 .त्यावर विचारमंथन करून एक रण(व्यूह)नीती सुनिश्चित करणे 8 . त्या रण(व्यूह)नीतीस लागू करण्यासाठी समोरच्याला असलेले बल / दौर्बल्य याचा आढावा घेणे 9 .बलवृद्धीसाठी नियोजन करणे 10 . दौर्बल्यर्हासास्तव नियोजन करणे वगैरे वगैरे सर्व योग्य मार्गदर्शक संस्था प्रामाणिकपणे प्रयत्न करणारं आहे. याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी .
Popular Posts
-
-
होलार समाजासाठी विभागीय कार्यशाळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाली – छत्रपती संभाजीनगरात बार्टी व होलार समाज संस्थेचा उपक्रम छत्रपती संभाजीनगर, 10 जुलै 2025 – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती वस्ती सुधार योजना (बार्टी), पुणे व होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले. ISO 9001:2015 प्रमाणित संस्थांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेचा मुख्य उद्देश जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र संदर्भातील अडचणी, बेरोजगारी, उद्योग धोरणे व युवा गट स्थापनेविषयी समाजाला योग्य मार्गदर्शन समाज कल्याण विभागाच्या विविध योजना होलार समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी सरकार, समाज, आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून समन्वय साधून विविध योजनेची अंमलबजावणी करणे हा कार्यशाळेचा उद्देश सामाजिक करणे हा होता. कार्यशाळेची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमाचे मान्यवराच्या हस्ते पूजन करण्यात आले प्रमुख या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून बार्टी, पुणेचे अप्पर जिल्हाधिकारी व प्रशिक्षण विभाग प्रमुख, प्रकल्प व्यवस्थापक श्री. नितीन सहारे, सचिन नांदेडकर, संबंधित जिल्ह्यांचे उपविभागीय अधिकारी, कन्नड येथील प्रांत तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी, जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, तसेच बार्टी संस्थेतील विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बार्टीचे श्री. नितीनजी सहारे सर यांनी सादर केले. त्यांनी प्रकल्पाच्या उद्देशांबाबत सविस्तर माहिती दिली. बार्टीच्या विविध योजना समजावून सांगितल्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदार महसूल विभाग यांनी जात प्रमाणपत्र प्रक्रिया व येणाऱ्या अडचणींचे सखोल विश्लेषण केले. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेबाबत जिल्हा जात पडताळणी समिती, छत्रपती संभाजीनगर यांनी मार्गदर्शन केले. होलार समाजाचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे यांनी समाजाच्या प्रमुख अडचणी अधिकार्यांच्या समोर प्रभावीपणे मांडल्या. व होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी पुणे मार्फत विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात इतिहास घडत आहे मा. सुनील वारे महासंचालक यांना व सर्व टीमचे समाज बांधवांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. अनेक समाजबांधवांनी देखील आपले प्रश्न प्रत्यक्षपणे मांडले. या संवादातून अनेक शंका दूर झाल्या व उपाययोजना सुचविण्यात आल्या. कार्यक्रमाचा समारोप व आभारप्रदर्शन श्री. नितीनजी सारे यांनी केले. या कार्यशाळेमुळे होलार समाजातील नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधता आला तसेच जात पडताळणी आणि रोजगाराच्या संधींबाबत मोलाचे मार्गदर्शन मिळाले सर्व कार्यक्रमाला उपस्थित समाज बांधव पदाधिकारी यांना संस्थेच्या वतीने धन्यवाद
-