नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेने मागील पाच वर्षात भरीव कार्य केले असून आज होलार समाजाला पडणाऱे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता या संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. ती वापरून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. 1 . ही संस्था अनुसूचित जाती अंतर्गत वंचित जाती मधील होलार समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काम करते. 2 .आम्ही आमचे कामकाज IS0 -9001 : 2015 ह्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या अनुसार काम करतो 2025 ला आंतरराष्ट्रीय IS0 प्रमाणपत्र मिळण्याच्या दिशेने संस्थेची वाटचाल सुरू 3 . आम्ही त्या प्रणालीत सातत्याने सुधारणा करण्यासाठी कार्यरत आहोत. 4 . आम्ही आम्हाला लागू असलेले भारताचे संविधान सर्व कायद्याचे पालन करतो. ‌ 5 . आम्ही वंचित जातीमध्ये होलार समाजासाठी त्यांच्या सर्व गरजांचे पालन करण्यास वचनबद्ध आहोत. 6 . शिका संघटित व्हा संघर्ष करा मी हमाली करीन मजुरी करीन वाटेल ते करीन पण मुला-मुलींना शिकवीन. 7 . डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे प्रसिद्ध विचार आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपले जीवन सुधारू शकतो 8 . संघटित होऊन समक्षाचा मुकाबला करू शकतो. 9 . आणि संघर्षाच्या माध्यमातून समनता आणि अधिकार मिळू शकतो. 10 . विद्या हीच खरी शक्ती आहे शिक्षण हा आपल्या समाजात बदल घडवणारा शक्तीशाली मार्ग आहे. शिकण्याची ओढ आणि ज्ञान हे यशाचे खरे साधन आहे. 11 . स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व बाबासाहेबांच्या मते समाजात शांतता आणि प्रगती यायला हवी असेल तर स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व हे तत्वे अत्यंत महत्त्वाचे आहेत. 12 . स्वाभिमानाने जगा. स्वाभिमानाने जगणं महत्त्वाचं आहे. आत्म सन्मान आणि स्वाभिमानाने व्यक्तिमत्व बळकट होत. 13 . आपली ताकद ओळखा-बाबासाहेबांनी कायम लोकांना त्यांची क्षमता ओळखून आपले अधिकार मिळण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा सल्ला दिला. . 14 . निर्णय घेताना स्वतःच्या मनाला विचार करा. बाबासाहेब सांगतात की निर्णय घेताना स्वतःच्या अंतकरणाची प्रामाणिक राहणे आवश्यक आहे त्यामुळे निर्णययात शुद्धता राहते. 15 . बदल स्वीकारा आणि नवा विचार करा-समाजात बदल घडवण्यासाठी नवीन विचाराची गरज आहे. नवे विचार आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे हे यशस्वी जीवनाचे गमन आहे बाबासाहेबांचे विचार जाणून शिक्षण घेऊन संघर्ष करा आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल तर आपण निश्चितच यशस्वी होऊ

Featured Post

होलार समाजासाठी विभागीय कार्यशाळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाली – छत्रपती संभाजीनगरात बार्टी व होलार समाज संस्थेचा उपक्रम छत्रपती संभाजीनगर, 10 जुलै 2025 – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती वस्ती सुधार योजना (बार्टी), पुणे व होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले. ISO 9001:2015 प्रमाणित संस्थांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेचा मुख्य उद्देश जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र संदर्भातील अडचणी, बेरोजगारी, उद्योग धोरणे व युवा गट स्थापनेविषयी समाजाला योग्य मार्गदर्शन समाज कल्याण विभागाच्या विविध योजना होलार समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी सरकार, समाज, आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून समन्वय साधून विविध योजनेची अंमलबजावणी करणे हा कार्यशाळेचा उद्देश सामाजिक करणे हा होता. कार्यशाळेची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमाचे मान्यवराच्या हस्ते पूजन करण्यात आले प्रमुख या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून बार्टी, पुणेचे अप्पर जिल्हाधिकारी व प्रशिक्षण विभाग प्रमुख, प्रकल्प व्यवस्थापक श्री. नितीन सहारे, सचिन नांदेडकर, संबंधित जिल्ह्यांचे उपविभागीय अधिकारी, कन्नड येथील प्रांत तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी, जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, तसेच बार्टी संस्थेतील विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बार्टीचे श्री. नितीनजी सहारे सर यांनी सादर केले. त्यांनी प्रकल्पाच्या उद्देशांबाबत सविस्तर माहिती दिली. बार्टीच्या विविध योजना समजावून सांगितल्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदार महसूल विभाग यांनी जात प्रमाणपत्र प्रक्रिया व येणाऱ्या अडचणींचे सखोल विश्लेषण केले. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेबाबत जिल्हा जात पडताळणी समिती, छत्रपती संभाजीनगर यांनी मार्गदर्शन केले. होलार समाजाचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे यांनी समाजाच्या प्रमुख अडचणी अधिकार्‍यांच्या समोर प्रभावीपणे मांडल्या. व होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी पुणे मार्फत विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात इतिहास घडत आहे मा. सुनील वारे महासंचालक यांना व सर्व टीमचे समाज बांधवांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. अनेक समाजबांधवांनी देखील आपले प्रश्न प्रत्यक्षपणे मांडले. या संवादातून अनेक शंका दूर झाल्या व उपाययोजना सुचविण्यात आल्या. कार्यक्रमाचा समारोप व आभारप्रदर्शन श्री. नितीनजी सारे यांनी केले. या कार्यशाळेमुळे होलार समाजातील नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधता आला तसेच जात पडताळणी आणि रोजगाराच्या संधींबाबत मोलाचे मार्गदर्शन मिळाले सर्व कार्यक्रमाला उपस्थित समाज बांधव पदाधिकारी यांना संस्थेच्या वतीने धन्यवाद

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts