होलार समाज सामाजिक संस्था पुणे (कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य) नोंदणीकृत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या पुढाकाराने. होलार समाजाचा सामाजिक ,आर्थिक व सर्वांगीण विकास व्हावा, शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा, तसेच जातीचे दाखले पडताळणी प्रमाणपत्रे काढताना येणाऱ्या विविध अडचणी भेडसावत आहेत त्या सोडवण्यासाठी विभागीय कार्यशाळा घेतल्या जात आहेत. तसेच महाराष्ट्रातील होलर समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेल्या नोंदीमुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता येत असलेल्या अडचणीमुळे होलार समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही. तसेच होलार समाज हा अनुसूचित जाती प्रवर्गातील अत्यंत मागासलेला समाज असून या समाजातील शैक्षणिक प्रगती अजूनही पुरेशी झालेली नाही.हे श्री नामदेवराव आयवळे यांनी वेळोवेळी शासनाच्या निदर्शनात आणून दिले आहे व सतत पाठपुरावा करत आहे तसेच अनेक संदर्भ देऊन जात प्रमाणपत्र व त्याच्या पडताळणी आणि याचे असणारे अनन्यास साधारण महत्त्व याविषयी भाषा करताना सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील लोकांनी स्वतःहून पुढाकार घेणे आवश्यक आहे आणि पाठपुरावा करणे त्याचबरोबर आवश्यक असणारी कागदपत्रे तसेच अर्ज करणे. महाराष्ट्रातील होलार समाज जात प्रमाणपत्र तपासून जे अद्याप वंचित आहेत, त्यांच्याकरिता विशेष अभियान तहसील व प्रात कार्यालयामार्फत आवर्जून राबविण्यात महासंचालक यांनी आदेश दिले आहेत समितीमार्फत ही विशेष शिबिरे याचे आयोजन करण्यात येणार आहे याकरिता महसूल विभाग बार्टी आणि समाज कल्याण विभाग यांच्या समन्वयातून तालुका व गाव पातळीवर देखील याबाबत विविध माध्यमातून जनजागृती तसेच प्रत्यक्ष शिबिराचे आयोजन देखील करण्यात येणार आहे याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी असे आव्हान श्री भगवान जावीर गुरुजी पेरणास्थान श्री दत्तात्रय कृष्णा करडे साहेब प्रवक्ता श्री बबन करडे साहेब सल्लागार श्री अर्जुन खांडेकर सचिव श्री जगन्नाथ पारसे साहेब खजिनदार
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-