📢 *महाराष्ट्रातील सर्व होलार समाज बांधवांना महत्त्वाचे आवाहन* 📢 होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे IS0 9001 2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील होलार समाज बांधवांच्या विविध शासकीय, आर्थिक, शैक्षणिक व महामंडळाशी संबंधित अडचणींचा राज्यस्तरीय आढावा घेण्यात येत आहे. याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी. सध्या अनेक समाज बांधवांना खालीलप्रमाणे विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे: * कर्ज प्रकरण मंजूर असूनही रक्कम न मिळणे * अर्ज करूनही कर्ज मंजूर न होणे * प्रलंबित कर्ज प्रकरणे * व्यवसायासाठी मदत न मिळणे * प्रशिक्षण योजनांचा लाभ न मिळणे * स्टॉल / परवाना संदर्भातील समस्या * शिष्यवृत्ती / शैक्षणिक योजनांमधील अडचणी * शासकीय योजनांची माहिती न मिळणे * महामंडळ कार्यालयीन कामांमध्ये अडचणी * इतर सामाजिक, शैक्षणिक किंवा आर्थिक समस्या तरी महाराष्ट्रातील ज्या समाज बांधवांना अशा प्रकारच्या समस्या किंवा अडचणी आहेत त्यांनी आपली संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे पाठवावी: 📌 *आवश्यक माहिती:* १) पूर्ण नाव २) गाव / तालुका / जिल्हा ३) मोबाईल नंबर ४) कोणत्या योजनेसाठी अर्ज केला आहे ५) अडचणीचे स्वरूप ६) अर्ज क्रमांक / कागदपत्रे (असल्यास) समाज बांधवांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व अडचणी व प्रलंबित प्रश्न एकत्रित करून संबंधित स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असून ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. ⚠ *जास्तीत जास्त समाज बांधवांनी आपली माहिती पाठवावी व हा संदेश महाराष्ट्रभर शेअर करावा.* धन्यवाद. श्री. बबनराव करडे नायब तहसीलदार संस्थेचे सल्लागार श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-