*होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे* *(ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था)* *संस्थापक अध्यक्ष:* श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे महाराष्ट्रातील सर्व मान्यवर समाज बांधवांना मनःपूर्वक नमस्कार 🙏 आपला विश्वास, सहकार्य आणि सातत्यपूर्ण पाठिंबा यामुळेच दिनांक 31 मार्च 2026 अखेर आमची यशस्वी वाटचाल शक्य झाली आहे. होलार समाजाच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी संस्था शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत असून, त्याच अनुषंगाने *डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे* यांच्या माध्यमातून विविध विभागीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे यांच्या नेतृत्वात पुणे, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथे कार्यशाळा पार पडल्या. या माध्यमातून हजारो समाज बांधवांच्या समस्या सोडवण्यात यश आले. *संस्थेचे प्रमुख उपक्रम व त्याचा लाभ:* • स्पर्धा परीक्षा अभियान – 160 विद्यार्थी लाभार्थी • महिला सशक्तिकरण अभियान – 170 महिला लाभार्थी • जात प्रमाणपत्र व पडताळणी अभियान – 204 लाभार्थी • व्यसनमुक्ती अभियान (कै. भगवान जावीर गुरुजी स्मरणार्थ) – 120 लाभार्थी • स्वावलंबन पत्र्याचे स्टॉल (रोजगार अभियान) – 45 लाभार्थी • सर्वधर्मसमभाव वधू-वर सूचक अभियान – 174 लाभार्थी • मार्गदर्शन व माहिती अभियान – हजारो लोक लाभार्थी आजपर्यंत महाराष्ट्रभरातून *9,298 सभासदांची नोंदणी* झाली असून, हीच आमची खरी ताकद आहे. संस्थेची अधिकृत वेबसाईटला *1,10,206 लोकांनी भेट* दिली असून, अल्पावधीत मिळालेला हा प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आपण दाखवलेला विश्वास आणि प्रेम हीच आमची उर्जा आहे. याच विश्वासाच्या बळावर आम्ही भविष्यातही अधिक उत्कृष्ट आणि परिणामकारक सेवा देण्याचा निर्धार करतो. आपले असेच प्रेम, सहकार्य आणि आशीर्वाद कायम राहू द्या 🙏 *धन्यवाद!* *संस्थेचे पदाधिकारी:* सचिव – अर्जुन खांडेकर सल्लागार – बबनराव करडे (नायब तहसीलदार) कायदे सल्लागार – अॅड. जी. एन. ऐवळे (ज्येष्ठ विधीज्ञ) उपाध्यक्ष – शोभा ऐवळे खजिनदार – जगन्नाथ पारसे सहसचिव – सारिका रुपेश हातेकर
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-