दिनांक. 5. एप्रिल 2026 📢 *महा योजना दर्शन* *प्रस्तुत: होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे* *संस्थापक अध्यक्ष:* श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे --- ## 📢 **आजच्या 5 महत्वाच्या योजना (भाग – 2)** ### 6️⃣ महाDBT शिष्यवृत्ती योजना • विद्यार्थ्यांना आर्थिक मदत • विविध शिष्यवृत्ती उपलब्ध • SC / ST / OBC / EWS साठी • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया • थेट खात्यात रक्कम --- ### 7️⃣ प्रधानमंत्री उज्ज्वला योजना • मोफत गॅस कनेक्शन • गरीब महिलांसाठी योजना • LPG सिलेंडर अनुदान • आरोग्यदायी स्वयंपाक • BPL कुटुंबांसाठी --- ### 8️⃣ स्वच्छ भारत मिशन (शौचालय योजना) • घरगुती शौचालयासाठी अनुदान • ₹12,000 पर्यंत मदत • ग्रामीण भागासाठी योजना • स्वच्छता अभियान • आरोग्य सुधारणा --- ### 9️⃣ प्रधानमंत्री आवास योजना • घर बांधण्यासाठी आर्थिक मदत • शहरी व ग्रामीण दोन्हीसाठी • सबसिडी सुविधा • कमी उत्पन्न गटासाठी • स्वतःचे घर मिळण्याची संधी --- ### 🔟 ई-श्रम कार्ड योजना • असंघटित कामगारांसाठी • ₹2 लाख विमा कवच • अपघात विमा लाभ • संपूर्ण भारतात लागू • ऑनलाइन नोंदण 🙏 *आपला विश्वास हीच आमची ताकद* *महा योजना दर्शन प्रस्तुत मार्गदर्शक* *सिताराम ऐवाळे*
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-