नमस्कार 🙏 महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेली **होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त)** ही संस्था अल्पावधीतच समाजाच्या विश्वासाचे केंद्र बनली आहे. संस्थेच्या अधिकृत वेबसाईटला एक *१, लाख ८0 हजारा पेक्षा अधिक भेटी** मिळाल्या असून, यावरून संस्थेच्या कार्याची पोहोच व विश्वासार्हता स्पष्ट होते. संस्था समाजाच्या गरजा ओळखून विविध उपक्रम राबवत आहे महाराष्ट्रातील सर्व विभागमध्ये कार्यशाळा पुणे विभागीय कार्यशाळा, नाशिक विभागीय कार्यशाळा, लातूर विभागीय कार्यशाळा ,छत्रपती संभाजी नगर विभागीय कार्यशाळा, नागपूर विभागीय कार्यशाळा, अमरावती विभागीय कार्यशाळा, कोकण विभागीय कार्यशाळा ,विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई व पुणे अशा संपूर्ण महाराष्ट्रात कार्य विस्तारत असून, समाजातील अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे. हे अत्यंत धाडसी, प्रामाणिक व समर्पित समाजसेवक असून, मर्यादित साधनसंपत्ती असतानाही स्वतःच्या कष्टातून व आर्थिक योगदानातून समाजसेवा करत आहेत. संस्थेमार्फत इतिहासात प्रथमच **होलार समाजासाठी स्वतंत्र विभागीय कार्यशाळा** आयोजित करण्यात आल्या. या कार्यशाळांमध्ये: • जात प्रमाणपत्र व जात वैधता पडताळणी प्रक्रियेचे मार्गदर्शन • समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती • स्वयं-सहाय्यता गट व युवक विकास मार्गदर्शन यासाठी संबंधित शासकीय विभागांना आमंत्रित करून मार्गदर्शन देण्यात आले. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, प्रतिनिधी व समाज बांधव सहभागी होऊन या कार्यशाळा यशस्वी ठरल्या. संस्थेचे प्रमुख उपक्रम: ✔ स्पर्धा परीक्षा अभियान ✔ महिला सशक्तीकरण अभियान ✔ जात पडताळणी व जात वैधता अभियान ✔ व्यसनमुक्ती अभियान ✔ युवक विकास अभियान ✔ सर्वधर्मसमभाव वधू-वर सूचक अधिकृत अभियान या सर्व उपक्रमांद्वारे समाजातील विविध समस्या सोडवून, समाजाच्या प्रगतीसाठी संस्था कटिबद्ध आहे. महाराष्ट्रभर फिरून प्रत्येक समाज बांधवाच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य अधिक व्यापक व प्रभावी होईल, याची खात्री आहे. धन्यवाद 🙏
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-