वेबसाईटवर ## होलार समाज जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र अभियान ### (महाराष्ट्र राज्य) होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने **होलार समाज जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र अभियान – महाराष्ट्र राज्य** राबविण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश होलार समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र प्रक्रियेबाबत योग्य, अधिकृत व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा आहे. ### अभियानाचे स्वरूप या अभियानाअंतर्गत दररोज आवश्यक माहिती, अभ्यास संदेश, मार्गदर्शक सूचना व प्रत्यक्ष अनुभवावर आधारित सल्ला वेबसाईट व इतर माध्यमांतून देण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षा तसेच शैक्षणिक व शासकीय लाभांसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्र प्रक्रियेची सखोल माहिती देणे हे या अभियानाचे वैशिष्ट्य आहे. ### अभियान मार्गदर्शक **श्री. बबनराव करडे** *(नायब तहसीलदार – अध्ययनाचे मार्गदर्शक)* ### संस्थेची माहिती **संस्थेचे नाव :** होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य **मानांकन :** ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था ### संस्थापक **श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे** होलार समाजातील सर्व विद्यार्थी, युवक व नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र प्रक्रियेबाबत अचूक माहिती मिळवावी, असे आवाहन करण्यात येते.
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-