📄 **होलार समाज जात प्रमाणपत्र व जात पडताळणी महाराष्ट्र मोफत अभियान – दैनंदिन वेबसाईट अपडेट** 🗓 **वार : शनिवार | दिनांक : 17 जानेवारी** **होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे** *ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था* यांच्या वतीने **दिनांक 1 जानेवारी पासून विना मोबदला (मोफत)** **नंबर 3️⃣ – होलार समाज जात प्रमाणपत्र व जात पडताळणी महाराष्ट्र मोफत अभियान** सातत्याने राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत होलार समाजातील समाज बांधवांना जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रक्रियेबाबत शासकीय नियमांनुसार आवश्यक व अचूक मार्गदर्शन मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिले जात आहे. या उपक्रमामध्ये — 🔹 जात प्रमाणपत्र काढण्याची शासकीय प्रक्रिया 🔹 जात पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती 🔹 अर्ज करताना घ्यावयाची काळजी 🔹 अधिकृत कार्यालयीन प्रक्रियेचे मार्गदर्शन यांचा समावेश आहे. 📌 समाज बांधवांनी या मोफत अभियानाचा लाभ घ्यावा व योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपली प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. 🎯 **जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान मार्गदर्शक :** **श्री. बबनराव करडे** (मा. नायब तहसीलदार, संस्थेचे सल्लागार) 🏛 **होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे** **संस्थापक : श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे**
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-