होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे आय. एस .ओ ..9001 2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था महाराष्ट्रामध्ये पहिली संस्था आहे. संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे स्पर्धा परीक्षा आणि मानसिक आरोग्य आज भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. पण हीच तरुण पिढी आज विद्यार्थीदशेत मानसिक दबाव, तणाव आणि असुरक्षिततेच्या जाळ्यात अडकलेली आहे. दरवर्षी भारतात तब्बल सहा कोटी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी आपले वर्चस्व पणाला लावतात नीट, जेईई, एमपीएसससी, यूपीएससी यास अन्य काही परीक्षा साठी दिवस रात्र कठोर मेहनत करतात. पण यश मिळणाऱ्यांचा टक्का आत्याल्प असतो. मेडिकल प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेतून 24 लाख परीक्षार्थीपैकी फक्त108 लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो, जेईई परीक्षेतून बारा लाख विद्यार्थ्यांमधून फक्त 16 हजार जागा उपलब्ध होतात तर यूपीएससी च्या दहा लाख उमेदवारातून फक्त एक हजाराच्या आसपास उमेदवाराची निवड होते.99 टक्के विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेतून अपयशाचा सामना करावा लागतो, हे कटू सत्य आहे स्पर्धा परीक्षेमध्ये अपयशासोबतच ताण, चिंता आणि मानसिक थकवा येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते मानसिक आरोग्य म्हणजे अशी स्थिती जिथे व्यक्ती स्वतःच्या क्षमता ओळखून तणावावर मात करते आणि समाजासाठी उपयोगी ठरते, पण भारतीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे चित्र वेगळं आहे. राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार 65०/० विद्यार्थ्यांना झोपेच्या समस्या आहेत,52०/० विद्यार्थी चिंतेत आहेत.45०/० विद्यार्थी निराश्यग्रस्त आहेत. तर 20०/० विद्यार्थ्यांना सातत्याने आत्महत्येचे विचार येतात. वर्ष 2013 ते 2022 दरम्यान विद्यार्थ्यांच्या आत्महत्या मध्ये तब्बल 64०/० वाढ झाली असून 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या चा आकडा शेतकऱ्यांच्या आत्महत्या पेक्षाही जास्त होत आहे.
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-