होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (नोंदणीकृत संस्था | ISO 9001:2015 प्रमाणित) संस्थापक अध्यक्ष: आदरणीय श्री. नामदेवराव आयवळे समाज बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपली अडचण... आमची जबाबदारी! होलार समाज सामाजिक संस्था ही एक विनामूल्य सेवा देणारी प्रामाणिक संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून समाज बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक त्या सर्व मार्गदर्शनाची मोफत सेवा दिली जाते. संस्थेचे शिष्टमंडळ सातत्याने शासन दरबारी समाजाच्या प्रश्नांवर ठोस पाठपुरावा करत आहे. सामाजिक न्यायासाठी पुढाकार! महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील घटक होलार समाज अजूनही अनेक अडचणींमुळे सामाजिक व शैक्षणिक प्रगतीपासून वंचित आहे. त्यामध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे – ५० वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध न होणे, ज्यामुळे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवणे कठीण जाते. विद्यार्थ्यांसाठी विशेष आवाहन ज्यांना जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही आणि त्यामुळे शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया किंवा शिष्यवृत्ती, नोकरी यामध्ये अडचणी येत आहेत, त्यांनी तात्काळ संस्थेशी संपर्क साधावा. संस्था काय करते? मोफत मार्गदर्शन आवश्यक कागदपत्रांची माहिती अर्ज भरताना सहाय्य पुरावे मिळवण्यासाठी सहकार्य शासन दरबारी योग्य पाठपुरावा संपर्क करा –7972140451 होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे "हक्कांची जाणीव... विकासाची दिशा!" होलार समाजासाठी, प्रामाणिकपणे आणि निष्कलंक सेवेसाठी कटिबद्ध.
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-