होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (ISO 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त संस्था) संस्थापक अध्यक्ष: श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे विशेष आवाहन सर्व छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व होलार समाजाच्या भगिनींना कळकळीचे निमंत्रण! आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी, बार्टी, पुणे यांच्या वतीने विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. इतिहासात नोंद दिनांक: 10 जुलै 2025 (गुरुवार) वेळ: सकाळी 10 ते सायं. 5 स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर कार्यशाळेचा विषय: होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक अडचणी आणि त्यावरील उपाय मार्गदर्शन करणारे अधिकारी: उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, महसूल विभाग जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती, छत्रपती संभाजीनगर सह आयुक्त, समाज कल्याण विभाग जिल्हा समाज कल्याण अधिकारी (जि. प.) गट विकास अधिकारी महत्त्वाचे मुद्दे: जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रियेतील अडचणी व उपाय समाजकल्याण विभाग व बार्टी अंतर्गत उपलब्ध योजना शैक्षणिक, आर्थिक मदत व मार्गदर्शन हा शिबीर फक्त दिखाऊपणा नसून, समाजाच्या उज्वल भविष्यासाठी एक प्रभावी पाऊल आहे. त्यामुळे सर्व भगिनींनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, ही विनंती. आपली उपस्थितीच आपल्या समाजाच्या उन्नतीचे द्योतक ठरेल! श्री. बबनराव करडे मा नायब तहसीलदार तथा संस्थेचे सल्लागार अँड. जी. एन .ऐवळे. कायदे तज्ञ तथा संस्थेचे कायदे सल्लागार. श्री. अर्जुन खांडेकर संस्थेचे सचिव. श्री. जगन्नाथ पारसे खजिनदार होलार समाज सामाजिक संस्था, पुणे
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-