होलार समाज सामाजिक संस्था – महत्त्वपूर्ण शिष्टमंडळ बैठक मुंबईत यशस्वीरित्या पार पडली दिनांक: 30 जुलै 2025, ठिकाण: संत रोहिदास चर्मोउद्योग व चर्मकार विकास महामंडळ, मुख्य कार्यालय, मुंबई होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त नोंदणीकृत संस्था असून, दिनांक 30 जुलै 2025 रोजी संस्थेचे शिष्टमंडळ श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे (संस्थापक अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे महत्त्वपूर्ण मागण्यांसंदर्भात बैठक पार पडली. ही बैठक श्रीमती प्रेरणा देशभद्रतार (व्यवस्थापकीय संचालक, संत रोहिदास चर्मोउद्योग व चर्मकार विकास महामंडळ) यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सखोल चर्चा झाली. विशेषतः NSFDC योजनेंतर्गत धनादेशांसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांच्या प्रलंबित प्रकरणांबाबत, अनेकांनी पैसे भरूनही त्यांना लाभ मिळालेला नाही, तर काहींनी अर्ज करूनही मंजुरी मिळालेली नाही, याकडे संस्थेच्या शिष्टमंडळाने लक्ष वेधले. संस्थेच्या वतीने 2023 पासून अद्यापपर्यंत एकही प्रकरण मंजूर न झाल्याबाबतची आकडेवारी सादर करताना समाजात यामुळे नाराजी आहे, हे व्यवस्थापकीय संचालकांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश व्यवस्थापकीय संचालकांनी दिले असून, सर्व विभागीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात येणार असल्याचे त्यांनी आश्वस्त केले. या बैठकीत संस्थेचे खालील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते: श्री. बबनराव करडे (माजी नायब तहसीलदार, सल्लागार) श्री. बापू महादेव आयवळे (नेते) सौ. शोभा मॅडम (उपाध्यक्ष) श्री. जगन्नाथ पारसे (खजिनदार) श्री. अनिल गुळदगड (पुणे विभागीय अधिकारी) श्री. संजय कुमार जावीर (कार्याध्यक्ष, नवी मुंबई) श्री. सिताराम ऐवळे साहेब (जत) ही बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात आणि खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडली.
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-