होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे lS0 9001-2015 आंतरराष्ट्रीय प्रमाणित संस्था. पत्ता. सर्वे नंबर 634/अ, गणपत नगर, बिबवेवाडी ,पुणे - 411037 ही संस्था दिनांक. 8.3.2019 रोजी स्थापन करण्यात आली ही संस्था होलार समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काही महत्त्वपूर्ण योगदान देता यावे या हेतूने 2019ला स्थापना करण्यात आली नामदेवराव आयवळे समाज भूषण कै.भगवान जावीर गुरुजी बबनराव करडे नायब तहसीलदार सातारा संस्थेचे मुख्य सल्लागार तसेच कायदेतज्ञ जि.एन . ऐवळे सल्लागार यांनी त्यांच्या काही सहकार्याच्या मदतीने 11 सदरसस्याने स्थापन केलेली संस्था आज 5 हजारापेक्षा अधिक सभासद नोंदणी करून सहभागी झाले आहेत. सभासद नोंदणी चालू आहे. होलार समाज सामाजिक संस्थेची स्वतंत्र वेबसाईट चालू आहे संस्थेच्या वेबसाईटला 55 हजारा पेक्षा जास्त लोकांनी भेट दिली आहे त्या जोरावर दिनांक.19.5.2025 ला होलार समाज सामाजिक संस्थेला IS0 9001-2015 आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. तसेच होलार समाज सामाजिक संस्था सर्व मार्गदर्शक संस्थांना व हितचिंतकांना अत्यंत नम्रपणाने हे सांगू इच्छिते की ह्या प्रमाणपत्राच्या प्राप्तीमुळे होलार समाजबांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध होऊन दृढनिश्चयाने अधिकाधिक कार्य आपल्या मार्गदर्शनाखाली करण्याची प्रेरणा संस्थेला मिळाली आहे. संस्थेला आपले साह्य व मार्गदर्शन भविष्यातही मिळत राहो ही प्रार्थना संस्था करत आहे. आपला विश्वासू श्री नामदेवराव श्रीरंग आवळे संस्थापक अध्यक्ष गोल्हार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य,पुणे
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-