https://holarsamajssp.blogspot.com/ https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/ मा.ना. श्रीमती माधुरीताईं मिसळ, राज्यमंत्री, नगरविकास, परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय, सामाजिक न्याय य वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफं महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई येथे दिनांक. 29.0 4. 2025 रोजी होलार समाजाच्या विविध मागण्या संदर्भात होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे शिष्टमंडळ श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात मा. महोदय, माधुरीताई मिसाळ राज्यमंत्री मुंबई यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले जसे की संत रोहिदास चर्म उद्योग व चर्मकार विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाचा उपक्रम एनएसएफडीसी मंजुरीसाठी प्रलंबित व मंजूर झालेले प्रकरण व मंजूर होऊन पण लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा न होणे महामंडळाच्या विविध जाचक अटी रद्द करणे. अशा अनेक प्रश्नांना राज्यमंत्री यांनी मदत करावी अशी विनंती केली होती त्यावेळी महोदयांनी होलार समाजाच्या विविध मागण्यांची घेतली दखल व तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत त्यावेळी संस्थेचे शिष्टमंडळ व मुंबई येथेल माझे सहकारी श्री सुरेश केंगार साहेब अंबरनाथ. श्री. रामचंद्र आयवळे साहेब कळंबोली शोभा मॅडम उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, सिताराम ऐवळे सदस्य जत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला तसेच लाभार्थ्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी संस्थेची संपर्क साधावा योग्य मार्गदर्शन मिळेल याची नोंद घ्यावी आपला विश्वासू तुमच्या हक्काचा माणूस श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे. संपर्क नंबर 7972 14 0451
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-