श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष. होलार समाज सामाजिक संस्था, पुणे संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील होलार समाज बांधवांना कळविण्यात येते की, जात प्रमाणपत्र मिळवण्याबाबतचा तसेच पन्नास वर्षांपूर्वीची नोंद मिळण्याकरिता महसूल कार्यालयामध्ये होलार समाजाला अडचणीचा सामना करावा लागत होता परंतु यापुढे अडचणीचा सामना करावा लागणार नाही. याबाबत. आत्ता त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, जात प्रमाणपत्र पडताळणी नियमांमध्ये नियम क्रमांक ४(३) मध्ये खालील प्रमाणे नमूद केलेले आहे. ▪️ अर्जदार, वरील पोट-नियम (२)चे नमूद केलेल्या कोणताही दस्तऐवज सादर करण्यास असमर्थ असेल तर अशा बाबतीत, अर्जदार आपल्या शपथपत्रांमध्ये त्या विषयाचे कारण नमूद करील आणि सक्षम प्राधिकारी निर्णय घेईल. ▪️होलार समाजाला अथवा समाजातील जो वंचित घटक असेल त्यांना जात प्रमाणपत्र देताना काही कागदपत्राचा अभाव असल्यास गृह चौकशी करून त्यांचा अहवाल व उपलब्ध कागदपत्रे याचा विचार करून जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाहीला सुरुवात होत आहे . जेणेकरून होलार समाजाला शासकीय योजनेचा लाभ घेता येईल. काही अडचणी आल्यात होलार समाज सामाजिक संस्था, पुणे या संस्थेकडे संपर्क साधावा मोबाईल नंबर ७९७२१४०४५१- ९७६४९६९०७४
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-