होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. संस्थेचे गुणवत्ता धोरण समाज बांधवांच्या उपयोगी उपक्रम . सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उपक्रम सातत्याने आयोजित करणे. समाज बांधवांच्या गरजा ओळखणे. राज्य शासनाकडे संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करणे. समाज बांधवांना त्याचा लाभ मिळण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध आहोत. संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव आयवळे यांनी केले आव्हान. ज्यांना जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्राची गरज आहे अशा समाज बांधवांनी अर्ज करा 15 ते 90 दिवसांत दोन्ही दाखले तुमच्या हातात. विविध कारणासाठी जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्राची गरज भासते शिक्षण आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी लागलेल्यासाठी ही दोन्ही दाखले बंधनकारक आहेत . अचूक कागदपत्रासह अर्ज केल्यास अर्जदाराला जातीचा दाखला 30 दिवसात तर जात वैधता प्रमाणपत्र 15 ते 90 दिवसात मिळतो असे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले जात पडताळणीसाठी येथे अर्ज करा. www. ccvis maharashtra. com व www. parti. valjdifY con या संकेतस्थळावर अर्जदाराला जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. अर्जासोबत जोडलेले कागदपत्रे पुरेशी व अचूक असतील तर संबंधिताला पंधरा ते 90 दिवसात जात वैधता प्रमाणपत्र मिळते. पण, काही त्रुटीची पूर्तता करायला अर्जदारास वेळेत पूर्तता न झाल्यास प्रमाणपत्र मिळत नाही अशा बांधवांनी व 1950 पूर्वीचे पुरावे अपुरी असतील तर जात पडताळणी समितीकडून प्रस्ताव अवैध ठरविला जातो. कागदपत्रांमध्ये विसंगती असल्यास किंवा वंशावळ सिद्ध होत नसल्यास देखील तो प्रस्ताव फेटाळला जातो. अशा समाज बांधवांनी होलार समाज सामाजिक संस्थेसी संपर्क साधावा संस्था प्रामाणिक प्रयत्न करून योग्य मार्गदर्शन करेल याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री नामदेवराव आयवळे संपर्क 7972140451 सर्व समाज बांधवांना आपट्याची पाने, झेंडुची फुले घेवूनी आली विजयादशमी दसऱ्याच्या आज शुभ दिनी सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी *दसऱ्यानिमित्त मंगलमय शुभेच्छा!* ☘️ 🙏 शुभेच्छुक सामाजिक संस्था, पुणे. सर्व सदस्य व शिष्टमंडळ .
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-