होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील वंचित होलार समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, व गरजू बेरोजगारासाठी व्यवसाय प्रशिक्षण व आर्थिक मदत व युवा गट तयार करून प्रशिक्षण व व्यवसाय नोकरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी दत्तक घेऊन पुणे येथे राहण्याची जेवणाची मोफत सोय करणारे व्यक्तिमत्व श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष मागील वर्षात या संस्थेने भरीव कार्य केले असून आज होलार समाजाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता या संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी पुणे संस्थेमार्फत विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेऊन त्यामध्ये युवकांना उद्योजकात प्रशिक्षण, समाज कल्याण मार्फत राबवित असलेल्या विविध योजना, जात प्रमाणपत्र जात पडताळणी प्रमाणपत्र मार्गदर्शनासह बार्टी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण यूपीएससी, एमपीएससी, आयबीपीएस, जेईई नीट, इत्यादी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, आधिछत्रवृत्ती उपक्रमाबाबतही माहिती देण्यात येत आहे जेणेकरून होलार समाजातील नागरिकांना त्याचा फायदा होईल. होलार समाज बांधवांना कळविण्यात हर्ष होत आहे की गेले अनेक वर्ष होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता येत असलेल्या अडचणींबाबत संस्थेचे संपर्क साधावा संस्था आपणास योग्य मदत व मार्गदर्शन करेल सर्व समाजबांधवांपर्यंत पोहोचवावे ही सर्वांना विनंती करणारे व्यक्तिमत्व आदरणीय श्री. भगवान हरिबा जावीर गुरुजी आदरणीय श्री.बबन करडे साहेब नायब तहसीलदार सातारा आदरणीय अर्जुन खांडेकर सचिव आदरणीय जगन्नाथ पारसे खजिनदार होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेचे सर्व पदाधिकारी सभासद तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे. संपर्क मोबाईल नंबर 7972140451
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-