महाराष्ट्रातील तमाम होलार बंधू आणि बहिणींना अतिशय नम्रपणे आवाहन करण्यात येते की. लातूर विभागातील होलार समाजाचा सामाजिक, आर्थिक, व सर्वागीण विकास व्हावा, शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा, जातीचे दाखले, पडताळणी प्रमाणपत्रे काढतांना येणाऱ्या विविध अडचणी बाबत सखोल मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवशीय कार्यशाळेचे नियोजन निश्चित आहे.... मा.सुनील वारे सर महासंचालक यांच्या आदेशानुसार. श्री.नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या अथक प्रयत्नाने . होलार समाजाचे प्रेरणास्थान श्री.भगवान हारीबा जावीर गुरुजी श्री.बबन करडे साहेब श्री. दत्तात्रय करडे सर श्री. जगन्नाथ पारसे श्री. अर्जुन खांडेकर यांच्या सहकार्याने इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी ,पुणे. यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वंचित होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक ,शैक्षणिक, अडी -अडचणी सोडवण्यासाठी विभागीय कार्यशाळा घेतल्या जात आहेत त्याबद्दल प्रथम बार्टीचे मनःपूर्वक आभारी आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात होलार समाज विखरला गेला आहे होलार समाजाला भेडसावणारे अडचणी शैक्षणिक बाबीकडे झालेले दुर्लक्ष व शिक्षणातील गळतीचे प्रणाम व जातीचे अस्तित्व व जातीच्या चुकीच्या नोंदी संदर्भात तसेच स्त्रियांचे स्थान होलार व होलेर यामधील अडचणी होलार समाजाला जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी होणाऱ्या अडचणी विविध शासकीय योजनेची माहितीचा अभाव तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोचली जात नाही शिक्षणाचा अभाव उत्पन्नाचा साधनाचा अभाव रूढी परंपराचा पगडा व समाजातील आर्थिक दुर्लभ लोकांसाठी ठोस असे उपाययोजना नाहीत वेळेवर उपचार सरकारी मदत उपलब्ध होत नाही अत्याचार ग्रस्त समाज बांधवांना योग्य तो न्याय मिळत नाहीये असे निर्माण झालेल्या अडचणी त्या होलार समाजाच्या मूलभूत प्रश्न आहेत हेच प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न होलार समाज सामाजिक संस्था करत आहे लवकरच तारीख आपणास कळवली जाईल याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी संपर्क 9764969074/7972140451
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-