महाराष्ट्रातील होलार समाज बांधवांना कळविण्यात येते की.अनेक वर्ष रखडलेल्या मागण्यांबाबत मा. महासंचालक डॉ .बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे. यांनी घेतली दखल श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या अथक प्रयत्नातून तसेच सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सर्व अध्यक्ष सदस्य सचिवांना दिले आदेश होलार समाजाला वेळेत व सुलभ रीतीने जात प्रमाणपत्र दिले जावेत अशा सूचना दिले आहेत. तसेच होलार समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी बाबत अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यशाळा आयोजित करून तात्काळ निकाली काढल्या जाव्यात त्याअनुषंगाने सदर प्रकरणावर महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे मिनियमन) अधिनियम २००० आणि त्यानुसार तयार केलेले नियम 2012 अन्वये व रक्त नातेसंबंधातील वैधता प्रमाणपत्र संदर्भात 24 नंबर 2017 च्या अधिसूचने अनुसार तसेच शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय. अनुसार कार्यवाही करण्यात यावी याबाबत आपल्या स्तरावरून स्थानिक पातळीवर विशेष मोहीम राबवून उपरोक्त अधिनियम व नियमातील तरतुदीनुसार होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यवाही आपल्या मार्फत करण्यात यावी . असे आव्हान मा. महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी पुणे यांनी केले आहे तसेच ज्या ज्या बांधवांच्या जातीच्या चुकीच्या नोंदी लागली आहेत अशा बांधवांनी याची नोंद घ्यावी होलर समाज सामाजिक संस्था पुणे व सर्व सदस्य सभासद आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे. संपर्क ७९७२१४०४५१/ ळ९७६४९६९०७४
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-