केंद्र व राज्य सरकारकडून अनुसूचित जाती-जमाती व इतर वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. तथापि, प्रशासकीय मर्यादा, माहितीअभाव व प्रभावी अंमलबजावणीच्या कमतरतेमुळे या योजना अपेक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत. परिणामी, समाजातील अनेक गरजू नागरिक विविध शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर होलार सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त) या संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली कार्य करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने संस्था केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे, लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे, तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास समस्या व अडचणी आणून देण्याचे कार्य प्रभावीपणे करीत आहे. या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात संस्थेला यश आले आहे. तसेच होलार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने मार्गदर्शन, समुपदेशन व पाठपुरावा करते. समाजातील प्रलंबित प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणणे, त्यावर तोडगा काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे, तसेच गरज भासल्यास प्रशासनास वेळोवेळी स्मरण करून देणे हे कार्य संस्था प्रामाणिकपणे करीत आहे.
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-