मतदानाबद्दलची नकारात्मकता संपवावी मुख्य संदेश: श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे IS0 9001 2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था, मतदान हा केवळ हक्क नसून राष्ट्रीय कर्तव्य आहे. देशाची प्रगती, विकास आणि लोकशाहीची ताकद मतदारांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून आहे. लेखातील मुद्दे: आजच्या राजकीय परिस्थितीत मतदारांचा राजकारणावरचा विश्वास कमी होत चालला आहे. भ्रष्टाचार, सत्तालोलुपता आणि स्वार्थी राजकारणामुळे नागरिक संभ्रमात आहेत. निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांवरही पक्षीय छाया जाणवते, ही चिंतेची बाब आहे. सुशिक्षित आणि संपन्न वर्ग मतदान टाळून सुट्टी साजरी करतो, तर गरीब आणि मध्यमवर्गीयच मतदान करतात. शिक्षित वर्गाने समाजाच्या हितासाठी पुढे येऊन मतदान करणे गरजेचे आहे. मतदानाबद्दलची नकारात्मकता दूर करण्यासाठी समाजात जनजागृती आणि प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेत. नागरिकांनी आपले हक्क आणि जबाबदाऱ्या ओळखून जागरूक नागरिक म्हणून वागावे. लेखाचा शेवटचा संदेश: “मतदान म्हणजे बदल घडवण्याचं शक्तिशाली शस्त्र आहे. म्हणूनच — मतदान करा, देशाच्या भविष्यासाठी आपली जबाबदारी पार पाडा.”
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-