निःशुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम – बार्टी पुणे आयोजक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे सहकार्याने: श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, संस्थापक अध्यक्ष – होलार समाज सामाजिक संस्था, पुणे कार्यक्रमाचे स्वरूप: कालावधी: 1 महिना (अनिवासी) फी: पूर्णतः मोफत (निःशुल्क) ठिकाण: महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण जिल्हा निहाय एक दिवसीय परिचय मेळावा आयोजित प्रशिक्षणाचे उद्दिष्ट: अनुसूचित जातीतील युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व कौशल्यांचे प्रशिक्षण देणे. प्रशिक्षणातील प्रमुख विषय: उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास कारखाना भेटी उद्योगासाठी नोंदणी व परवाने स्टार्टअप इंडिया / स्टँडअप इंडिया मुद्रा योजना / मेक इन इंडिया यशस्वी उद्योजकांशी चर्चा उद्योग निवड व उभारणी प्रक्रिया बाजारपेठेचे सर्वेक्षण महिला उद्योजकांसाठी धोरण प्रकल्प अहवाल तयार करणे निधी उभारणीचे मार्ग कर्ज योजना / महामंडळांच्या योजना कंपनी नोंदणी व प्रक्रिया विक्री व व्यवस्थापन कौशल्य अभिप्रेरणा प्रशिक्षण विविध क्षेत्रातील उद्योग संधी (कृषी, खाद्य, केमिकल, प्लास्टिक इ.) आवश्यक कागदपत्रे (प्रत्येकी 2 झेरॉक्स): जातीचा दाखला आधार कार्ड शाळा सोडल्याचा दाखला / मार्कलिस्ट पॅनकार्ड 2 पासपोर्ट साईज फोटो पात्रता निकष: जात: अनुसूचित जाती (SC) वय: 18 ते 45 वर्ष शिक्षण: किमान 8वी पास महाराष्ट्रातील रहिवासी: किमान 15 वर्षे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असावी कोणत्याही बँकेचा/संस्थेचा डिफॉल्टर नसावा (क्रेडिट स्कोअर चांगला असावा) महिलांना प्राधान्य अर्ज व माहिती कशी मिळवावी: बार्टी पुणे वेबसाइटला भेट द्या: https://barti.maharashtra.gov.in जिल्हा प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क करा किंवा संपर्क साधा: श्री. नामदेवराव आयवळे मो. 97649 69074 (होलार समाज सामाजिक संस्था, पुणे) निवड प्रक्रिया: जिल्हा निहाय मेळावा होईल अर्ज व कागदपत्रांची तपासणी मुलाखतीच्या आधारे निवड
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-