नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे आय. एस .ओ ..9001 2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे दिनांक. 17.8 2025 . ते. 28.8.2025 रोजी पुणे येथे विपश्यना शिबिरात सहभागी झालो होतो खरंच मला मिळालेला अनुभव अतिशय उत्तम असा मिळालेला अनुभव आहे खालील माहिती. विपश्यना म्हणजे काय? विपश्यना म्हणजे "जशी आहे तशी गोष्ट पाहण्याची कला". ही बुद्धकालीन ध्यान पद्धत असून, तिचा उद्देश आहे मनाचं शुद्धीकरण आणि अंतर्मुख होऊन जीवनाचं सत्य जाणणं. विपश्यना ध्यानाचे महत्त्व व उपयोग: 1. मानसिक शांती आणि तणावमुक्त जीवन: दिवसाला १०-११ तास ध्यानामुळे मन शांत होतं. चिंता, भीती, राग, हेवा यासारख्या भावना कमी होतात. 2. एकाग्रता आणि मानसिक स्पष्टता वाढते: सतत स्वतःच्या श्वासावर आणि शरीरिक संवेदनांवर लक्ष केंद्रित करताना एकाग्रता विकसित होते. निर्णय क्षमता सुधारते. 3. स्वतःचा अभ्यास (Self-awareness): मौनामुळे (Noble Silence – आर्य मौन) मन अधिक स्पष्ट होते आणि स्वतःच्या विचार-भावनांचा अभ्यास करता येतो. 4. शिस्त आणि संयम शिकवते: ठराविक दिनचर्येचे पालन, साधे अन्न, कोणताही बाह्य संपर्क नाही – यामुळे जीवनशैली शिस्तबद्ध होते. 5. धार्मिक नसून वैज्ञानिक पद्धती: कोणताही विधी, पूजा, मंत्र नाहीत. ही ध्यानपद्धती सर्वधर्मसमभाव ठेवून "मनावर काम" करते. 6. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त: अनेक लोक म्हणतात की नियमित विपश्यना केल्याने झोप चांगली लागते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि मनोविकार दूर राहतात. विपश्यना शिबिरातले महत्त्वाचे नियम: मौन पालन (आर्य मौन) कोणताही संपर्क नाही – मोबाईल, पुस्तक, लेखन बंद साधे, सात्विक अन्न पुरुष व महिला वेगळे राहतात, परंतु ध्यानसत्र एकत्र असू शकते रोज १० तास ध्यान तुमच्यासारख्या साधकांसाठी हे कसं फायदेशीर? समाजसेवेचं काम करताना, अंतर्मुख होणं, मनःशांती ठेवणं फार महत्त्वाचं असतं. आपल्या कृती मागचं हेतू, राग-वेदना इत्यादी टाळणं – हे शक्य होतं. हळूहळू व्यक्तिमत्वात परिवर्तन दिसू लागतं. विपश्यना म्हणजे जीवनशैली बदलणारी कला तुम्ही अनुभवलेली शिस्त, मौन, अंतर्मुखता – ही फक्त १० दिवसांची गोष्ट नाही, तर आयुष्यभर उपयोगी ठरणारी साधना आहे.

Featured Post

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे आय. एस .ओ ..9001 2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था महाराष्ट्रामध्ये पहिली संस्था आहे. संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे स्पर्धा परीक्षा आणि मानसिक आरोग्य आज भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. पण हीच तरुण पिढी आज विद्यार्थीदशेत मानसिक दबाव, तणाव आणि असुरक्षिततेच्या जाळ्यात अडकलेली आहे. दरवर्षी भारतात तब्बल सहा कोटी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी आपले वर्चस्व पणाला लावतात नीट, जेईई, एमपीएसससी, यूपीएससी यास अन्य काही परीक्षा साठी दिवस रात्र कठोर मेहनत करतात. पण यश मिळणाऱ्यांचा टक्का आत्याल्प असतो. मेडिकल प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेतून 24 लाख परीक्षार्थीपैकी फक्त108 लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो, जेईई परीक्षेतून बारा लाख विद्यार्थ्यांमधून फक्त 16 हजार जागा उपलब्ध होतात तर यूपीएससी च्या दहा लाख उमेदवारातून फक्त एक हजाराच्या आसपास उमेदवाराची निवड होते.99 टक्के विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेतून अपयशाचा सामना करावा लागतो, हे कटू सत्य आहे स्पर्धा परीक्षेमध्ये अपयशासोबतच ताण, चिंता आणि मानसिक थकवा येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते मानसिक आरोग्य म्हणजे अशी स्थिती जिथे व्यक्ती स्वतःच्या क्षमता ओळखून तणावावर मात करते आणि समाजासाठी उपयोगी ठरते, पण भारतीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे चित्र वेगळं आहे. राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार 65०/० विद्यार्थ्यांना झोपेच्या समस्या आहेत,52०/० विद्यार्थी चिंतेत आहेत.45०/० विद्यार्थी निराश्यग्रस्त आहेत. तर 20०/० विद्यार्थ्यांना सातत्याने आत्महत्येचे विचार येतात. वर्ष 2013 ते 2022 दरम्यान विद्यार्थ्यांच्या आत्महत्या मध्ये तब्बल 64०/० वाढ झाली असून 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या चा आकडा शेतकऱ्यांच्या आत्महत्या पेक्षाही जास्त होत आहे.

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts