होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे – ISO 9001:2015 प्रमाणित संस्था मार्फत बार्टी पुणे येथे मान्यवरांचे स्वागत व अभिनंदन दि. 22 जुलै 2025 रोजी होलार समाज सामाजिक संस्था, पुणे यांच्या वतीने मा. सुनील वारे साहेब, महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांचे हार्दिक स्वागत व मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले. या स्वागत समारंभासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. नामदेवराव आयवळे, तसेच शिष्टमंडळातील बबन ऐवळे, शोभा मॅडम, सिताराम ऐवळे उपस्थित होते. यावेळी मा. वारे साहेब यांना फुलांचे बुके देऊन सन्मानित करण्यात आले. या अनुषंगाने दिनांक 10 जून 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर विभागातील होलार समाजाच्या अडचणी संदर्भात बार्टी पुणे मार्फत एक दिवसीय विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. कार्यशाळेमध्ये सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना महसूल विभागामार्फत जात प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया, जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठीचे मार्गदर्शन, तसेच समाजकल्याण विभागाच्या विविध योजना, स्वयं सहाय्यता गट आणि युवागट विकास यावरील सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यशाळेसाठी संबंधित विविध विभागांचे अधिकारी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन करून उपस्थित समाजबांधवांना या मार्गदर्शनाचा मोठ्या प्रमाणावर लाभ होऊ दिला.
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-