होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे IS0 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे आंतरराष्ट्रीय मानकर प्रात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांचा छत्रपती संभाजीनगर येथे सत्कार छत्रपती संभाजीनगर | दि. 8 जुलै 2025 — होलार समाज सामाजिक संस्था, पुणे यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित एक दिवशीय कार्यशाळा निमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी मराठवाडा विभागातील (हिंगोली, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर) होलार समाज बांधवांची भेट घेऊन कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या दौऱ्यात नामदेवराव आयवळे यांचा छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. प्रा. संतोष गडदे (होलार समाज चळवळीचे अभ्यासक) यांच्या हस्ते त्यांना पुष्पहार अर्पण करून गौरवण्यात आले. सदर प्रसंगी कृष्णा ऐवळे/ निवृत्त उप अभियंता म्हाडाऔरंगाबाद , अँड. होनमाने, श्री सुधाकर केजगीर, शैलेश जाधव, नवनाथ केजगीर, नवनाथ गडदे, सचिन केजगीर, सुरज केजगीर हे समाज बांधव उपस्थित होते. संस्थेच्या या उपक्रमातून होलार समाजातील बांधवांमध्ये एकता, जागरूकता आणि सामाजिक उन्नतीचा प्रेरणादायी संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-