होलार समाज सामाजिक संस्था, (महाराष्ट्र राज्य) संस्थेच्या वतीने जाहीर आवाहन होलार समाजाचा सामाजिक आर्थिक व सर्वागीण विकास व्हावा, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, जातीचे दाखले, पडताळणी प्रमाणपत्रे काढताना येणाऱ्या विविध अडचणी बाबत सखोल मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूर येथे नियोजित बैठक महाराष्ट्र शासन अध्यक्ष/सदस्य/सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कोल्हापूर यांच्या आदेशाने नियोजित बैठक .डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दुसरा मजला विचारे मळा कोल्हापूर या ठिकाणी दि. 20 मार्च 2025 रोजी वेळ दुपारी 1 वाजता आयोजित केली आहे. होलार समाज सामाजिक संस्था, पुणे यांच्या शिष्टमंडळ श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात व अथक प्रयत्नाने. कोल्हापूर जिल्ह्यातील होलार समाज बांधवांना कळविण्यात येते की, महाराष्ट्रातील होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेल्या नोंदीमुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता येत असलेल्या अडचणीमुळे होलार समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही होलार समाजाच्या जात प्रमाणपत्राबाबत अडचणीचे निरसन करून होलार समाजाला वेळेत व सुलभ रीतीने जात प्रमाणपत्र दिले जावे या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर येथे संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळ कोल्हापूर श्री. एन एम पवार साहेब विभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तिसरा मजला विचारे मळा कोल्हापूर येथे दुपारी 3 वाजत बैठक नियोजित आहे. तसेच होलार समाज सामाजिक संस्थेने मागील सहा वर्षात या संस्थेने भरीव कार्य केले असून आज होलार समाजाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता या संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे ते वापरून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील होलार समाज बांधव, प्रतिनिधी, महिला, विद्यार्थी, पालक, कार्यकर्ते, यांना आमंत्रित करण्यात येत आहे. सदर बैठकीचा सर्वांना लाभ होईल.
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-