होलार समाज सामाजिक संस्था, पुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माननीय. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 20 .03 .2025 रोजी वेळ दुपारी 2 वाजता अध्यक्ष/सदस्य /सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कोल्हापूर यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली. विषय:- होलार समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी बाबत अडचणीचे निरसन करण्याकरिता उपविभागी अधिकारी, (महसूल) विभाग कोल्हापूर जिल्हा सर्व तहसीलदार कोल्हापूर जिल्हा सर्व यांच्यसमवेत एक शिबिर आयोजित करण्याबाबत. विनंती करण्यात आली या विनंतीला मान देऊन माननीय अध्यक्ष/सचिन/ सदस्य यांनी आम्ही लवकरात लवकर एक शिबिर आयोजित करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. त्यावेळी उपस्थित संस्थेचे शिष्टमंडळ व कोल्हापूर जिल्ह्यातील समाज बांधव यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. बबनराव करंडे माजी नायक तहसीलदार संस्थेचे सल्लागार. श्री.शंकर केंगार प्राध्यापक संस्थेचे जिल्हाध्यक्ष. श्री. दिगंबर केंगार श्री. निलेश केंगार श्री.सागर केंगार श्री जगन्नाथ केंगार सौ. अक्काताई केंगार सौ. नम्रता केगार श्री. अनिल कोळेकर श्री. जनार्धन ऐवळे श्री. बजरंग देसाई श्री. दगडू करडे श्री. बाजीराव वाजंत्री करडे श्री. विलास तोरणे श्री. प्रवीण केंगार श्री. चंद्रकांत कांबळे श्री देवेंद्र शामराव पांडव श्री. युवराज केंगार यांच्या उपस्थित संपन्न झाली. आपला विश्वास तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री. नामदेवराव आयवळे पुणे
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-