श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था, पुणे सर्व जाती धर्मातील समाजाचा विकास हेच आमचे ध्येय सर्वांना कळविण्यात येते की महाराष्ट्र जलसंवर्धन प्रकल्प अंतर्गत जागा भरणेबाबत. अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या उमेदवारांने लेखी स्वरूपात अर्ज केले आहेत त्यांना एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे तसेच कामाला सुरुवात पण झाली आहे. अहिल्यानगर व सोलापूर या जिल्ह्यामध्ये. मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात झाली आहे. तसेच ज्यांना खरंच कामाची गरज आहे अशा गरजू उमेदवाराने तात्काळ अर्ज संस्थेकडे करावेत तसेच उमेदवारास शिक्षणाची अट नाही. उमेदवारास मासिक पगार 12000 ते 20000 असेल. उमेदवारास मासिक पेट्रोल भत्ता 3000 रुपये असेल. कोणतीही ऑनलाइन प्रक्रिया नाही. लेखी स्वरुपात अर्ज करा आणि ती नोकरी मिळवा. नेम व अटी: उमेदवाराकडे स्वतःची मोटरसायकल असणे आवश्यक. उमेदवाराकडे स्वतःचा स्मार्टफोन असणे आवश्यक. उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक. अर्ज करण्याचे ठिकाण. होलार समाज सामाजिक संस्था, पुणे अधिक माहितीसाठी संपर्क नामदेवराव आयवळे-७१७२१४०४५१ एस. एन .तडवी- ९३०९९३५६५५ किरण आळंदकर-९७६६३३३९९९
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-