होलार समाज सामाजिक संस्था पुणे या संस्थेच्या शिष्टमंडळाने दि.28.11.2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे कार्यालयाला भेट दिली समाज बांधवांना कळविण्यात आनंद होत आहे. खुशखबर खुशखबर. अनुसूचित जातीतील घटक होलार समाजामध्ये जन्म घेतला परंतु त्या जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळत नाही कारण अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे तसेच जात पडताळणी करताना येणाऱ्या अडचणींमुळे संघर्ष करावा लागत आहे त्यामुळे आज पर्यंत होलार समाज बांधवांचे मोठे नुकसान झालेले आहे. कारण महाराष्ट्रातील होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेल्या नोंदीमुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता येत असलेल्या अडचणीमुळे होलार समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा आज अखेर लाभ घेता आलेला नाही. होलार समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जात प्रमाणपत्र महत्वाचे. त्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी बाबत अडचणीचे निरसन करून होलार समाजाला वेळेत व सुलभ रीतीने जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे, होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. यांनी सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे या कार्यालयाकडे केलेला पाठपुरावा व अथक प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे आलेले यश या पुढे संघर्ष व अडचणीचा सामना करावा लागणार नाही काही अडचणी आल्यास होलार समाज सामाजिक संस्थेसी संपर्क साधावा आपणास योग्य मार्गदर्शन व मदत केली जाईल. संपर्क मो.7972140451
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-