गुणवत्ता धोरण. होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य रजि.नं.एफ53452 गणपत नगर बिबेवाडी पुणे 37. 1 ही संस्था वंचित होलार समाजाच्या उन्नतीसाठी काम करते. 2 आम्ही आमचे कामकाज आय एस ओ 9001ः2015 ह्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या अनुसार करतो. 3 आणि त्या प्रणालीत सातत्याने सुधारणा करण्यासाठी कार्यरत आहोत. 4 आम्ही आम्हाला लागू असलेल्या सर्व कायद्याचे पालन करतो. 5 आम्ही वंचित होलार समाजासाठी/त्यांच्या सर्व गरजांचे पालन करण्यास वचनबद्ध आहोत. 6 शिका संघटित व्हा, संघर्ष करा मी हमाली करीन मजुरी करीन वाटेल ते करीन मुला-मुलींना शिकवीन. शिकण्याची संधी.... 1 स्वप्न पहा, कारण तेच आपल्या कार्याची प्रेरणा बनतात. 2 संघर्ष न करता कोणतेही यश मिळत नाही त्यामुळे मेहनत करा. 3 आपल्या विचारांमध्ये खूप शक्ती आहे, त्यांना सकारात्मक ठेवा. 4 जीवनात मोठा टप्पा गाठायचा असेल तर आधी छोटे छोटे टप्पे गाटा. 5 कधीही हार मानू नका प्रत्येक चुका मध्ये काहीतरी शिकण्याची संधी असते. 6 विचारपूर्वक निर्णयला मेहनतीची जोड दिली की यश नक्की मिळते. होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. ही संस्था आय एस ओ 9001ः2015 या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता दिशेने वाटचाल आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री. नामदेवराव आयवळे पुणे
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-