मा.सुनील वारे सर महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे. यांच्या आदेशाने. महाराष्ट्रातील वंचित होलार समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र महत्त्वाचे, होलार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव आयवळे. संस्थेने भरीव कार्य केले असून आज होलार समाजाला येणाऱ्या प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता या संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे ती वापरून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. महाराष्ट्रातील तमाम होलार बंधू आणि बहिणींना अतिशय नम्रपणे आवाहन करण्यात येते की आपला भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून ते आज अखेर होलार समाजाचा एक ही प्रश्न सुटलेला नाही त्याला अनेक कारणे असूशक्ततात. परंतु होलार समाजाचे प्रेरणास्थान कै. भगवान हरीबा जावीर गुरुजी यांचे मार्गदर्शन व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव आयवळे यांच्या अथक प्रयत्नामुळे होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेली नोंद व त्यामुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता होत असलेल्या अडचणी गेली अनेक वर्षे पासून भेडसावत आहेत शैक्षणिक करिता घेण्यात येणाऱ्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी या व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राखीव प्रवर्गामधून प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांना जात प्रमाण वैधता पडताळणी त्या अडचणी सोडविल्या जातील संस्थेसी संपर्क साधावा परंतु आपण स्वतः जिल्ह्याच्या ठिकाणी प्रोसेस करावी न दाखला मिळाल्यास किंवा काही त्रुटीअसल्यास संस्थेशी संपर्क साधावा व प्रमाणपत्र पडताळणी समितीची प्रोसेस केलेली पावतीची प्रत संस्थेला पाठवावी संस्था प्रामाणिक प्रयत्न करेल याची नोंद समाज बांधवांनी द्यावी होलार समाज सामाजिक संस्था पुणे आपला विश्वासू नामदेवराव अयवळे संपर्क 7972140451
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-