https://holarsamajssp.blogspot.com/* *https://holarsamajsama jiksanstha.blogspot.com/* होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीनेकै. भगवान हरिबा जावीर गुरुजी यांच्या आत्म्याला शांती देवो म्हणून शोक सभेचे आयोजन दिनांक 1. 9. 2024 रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबेवाडी पुणे येथे वेळ दुपारी 3 वा. आयोजित करण्यात येत आहे. तसेच होलार समाज भूषण समाजाचे प्रेरणास्थान कै. भगवान हरिबा जावीर गुरुजी हे दि.21.8.2024 रोजी आपणास सोडून गेले असले तरी त्यांचे विचार व त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण सर्व नातेवाईक समाज बांधव मित्र परिवार यांनी शोक सभेला वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे. तसेच. कै. भगवान हरिबा जावीर गुरुजी आपल्यामध्ये उपस्थित नाहीत, त्यांचे दुःख निधन झाले भगवान गुरुजी बद्दल ही गोष्ट समजली तेव्हा विश्वास बसला नाही. माझे मन भरून आले आणि डोळ्यातून पाणी आपोआप येऊ लागले. भगवान गुरुजी हे माझे गुरु होते ते होलार समाजाचे प्रेरणास्थान होते तसेच समाज भूषण होते त्यांचा स्वभाव मनमिळाऊ प्रेमळ होता. ते पटकन इतरांना मदत करणारे होते. आज त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या दुःखामध्ये मी माझे कुटुंब, होलार समाज सामाजिक संस्था सर्वजण सहभागी आहोत जो आवडे सर्वांना तोच आवडी देवाला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहून सहकार्य करावे होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेचे सर्व पदाधिकारी सभासद समाज बांधव संपर्क 7972140451
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-