मा. श्री.माणिकराव भडगे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस यांनी होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेस भेट.. संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबेवाडी पुणे येथे दिनांक 3/3/2024 रोजी सदिच्छा भेट दिली दुपारी 3 वा. संस्थेच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली तसेच फुल बुके देऊन मा. भगवान जावीर गुरुजी होलार समाजाचे प्रेरणास्थान व व समाज बांधवांनी मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.नामदेवराव आयवळे व अर्जुन खांडेकर सचिव श्री .अमित जावीर मानवता मंदिराचे अध्यक्ष.व श्री.संभाजी चौगुले श्री.विशाल जावीर श्री संजय अहिवळे श्री .विजय आयवळे श्री राजेंद्र केंगार श्री किरण भडगे श्री. परशुराम ढोबळे श्री नवनाथ ऐवळे यांच्या हस्ते जाती व्यवस्थेचे निर्मूलन हे पुस्तक भेट देउन स्वागत करण्यात आले श्री भगवान जावीर गुरुजी मार्गदर्शन करताना म्हणाले माणिकराव भडांगे तुम्हाला पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस एवढे मोठे पद मिळाले आहे त्याचा वापर समाजाच्या हितासाठी करावा समाज तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचेल तसेच नामदेवराव आयवळे बोलत होते होलार समाजाच्या हिताचे एक तरी काम करावे समाज तुमच्या पाठीशी उभा राहील.व अमित जावीर साहेब बोलत होते प्रत्येक शहरात गावात तालुक्यात जिल्ह्यात तरुणांचे युवा गट तयार करून त्यांना योग्य दिशा दिली जावी तळागाळातील समाज बांधवांना न्याय मिळावा ही अपेक्षा व्यक्त केली. यावेळी श्री माणिकराव भडांगे साहेब बोलत होते मला मिळालेल्या पदाचा वापर मी समाजासाठी जास्तीत जास्त कल्याणा करता करेन समाज बांधवांनी माझ्यावर विश्वास ठेवावा व समाज हिताची कामे घेऊन माझ्याकडे आले पाहिजे मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन असे बोलून सर्वांची मने जिंकली तसेच बिबेवाडी परिसरातील समाज बांधव तसेच शोभा महेश जोशी रंजना आयवळे संभाजी तोरणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-