महाराष्ट्रातील होलार समाज लाभार्थ्यांनी लीडकॉम महामंडळाकडे व्यवसायासाठी अर्थसहाय्यासाठी 50 हजार ते 50 लाखापर्यंतचे केलेले अर्ज लाभार्थ्याच्या नावाने काढले जाणार चेक. मा. धम्मज्योती गजभिये साहेब व्यवस्थापकीय संचालक यांनी दिले आदेशाने. श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या अथक प्रयत्नातून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे. मा. धम्मज्योती गजभिये साहेब व्यवस्थापकीय लीडकॉम मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित मान्यवर यांच्यासमवेत मंगळवार दिनांक 20/ 2 / 2024 रोजी बैठकीमध्ये महाराष्ट्रातील होलार समाजाला न्याय मिळण्याबाबत मागणी केली तसेच महाराष्ट्रातील होलार समाजाने व्यवसायासाठी पन्नास हजार ते 50 लाखापर्यंतचे लीड कॉमकडे अर्ज प्राप्त झालेले अर्ज मंजूर करून लाभार्थ्यांच्या नावाने चेक काढावेत. तसेच काही जाचक अटी शितल कराव्यात . तसेच प्रत्येक जिल्ह्याचे व्यवस्थापक यांना पत्रक काढून होलार समाजाचे कर्ज प्रकरण अर्जांची यादी आपल्या स्तरावरून मागून घेतली जावी. तसेच ज्यांची कागदपत्रे पूर्ण प्राप्त झाली आहेत असे अर्ज व काही पेंटिंग राहिलेली अर्ज लाभार्थ्याच्या नावाने चेक काढले जावेत. अशा मागण्या करण्यात आल्या. तसेच महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराज पेशवा, ब्रिटिश ,आणि मुघल, काळापासून आणि सृष्टी निर्माण झाल्यापासून महाराष्ट्र राज्यात होलार समाज राहत आहे हा समाज भूमिहीन समाज आहे या समाजाचा मूळ रोजगार वाद्य वाजविणे जुन्या चप्पल दुरुस्त करणे आणि आपल्या पोटाची खळगी भरणे पूर्वजांचा व्यवसाय करीत आहेत. तसेच अत्यंत मागासलेला समाज या समाजातील शैक्षणिक प्रगती अजूनही पुरेशी झालेली नाही म्हणून या समाजात जास्तीत जास्त अर्थसहाय्य दिले जावेत . अशी मागणी शिस्त मंडळांनी केली त्यावेळी अण्णा पाटील ,जगन्नाथ पारसे, मारुती कांबळे, सचिन करडे, संस्थेचे संचालक मंडळ व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव श्रीरंग आयवळे यांच्या उपस्थितीत मीटिंग संपन्न झाली
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-