मंगळवार दिनांक 10/1/.2024 समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने काम करावे नामदेवराव श्रीरंग अयवळे संस्थेचे अध्यक्ष यांचे आव्हान या संस्थेने भरीव कार्य केले असून आज होलार समाजाला पडणाऱ्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता या संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे ती वापरून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सामाजिक काम करताना समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून ते काम केल्यास ते अधिक जोमाने वाढते प्रत्येकाने सामाजिक उत्तरदायित्त्वाचे भान ठेवणे आवश्यक आहे मुलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी पुढे येण्याची गरज आहे समाजातून आपण मोठे होत असताना ते मोठेपण आपल्या एकट्याच्या बळावर प्राप्त होत नसून आपल्याला प्रगतीत समाजातील छोट्या मोठ्या अशा सर्वच घटकाचे योगदान आणि सहभाग असतो समाजातील अशा सक्षम व्यक्ती आणि संस्थांनी वंचित बेघर आणि मुख्य प्रवाह पासून दूर असलेल्या मुलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. तसेच निसर्गाच्या नियमानुसार तुम्ही जे काही चांगले वाईट कृत्य कराल त्या कृत्याची चांगली वाईट फळे या ना त्या मार्गाने तुमच्यापर्यंत पोहोचतात असतात यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर मागे वळून पाहताना आपण हजारोंना मागे सोडून येथे आलो आहोत याची जाणीव ठेवून ते देखील आपल्यापर्यंत कसे पोहोचतील त्याचा जीवनस्तरदेखील कसा उचावेल हे आपण पाहिले पाहिजे तेच काम संस्थेच्या माध्यमातून चालू आहे आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-