मा. सुनील वारे सर महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी पुणे. यांच्याकडे सतत पाठपुरावा करून होलार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या पुढाकाराने विशेष मोहीम महाराष्ट्रातील होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्याचे बार्टीचे महासंचालक यांनी दिले आदेश प्रत्येक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीना प्रत्येक जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी शिबिरे घेऊन जात प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच महाराष्ट्रातील होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेल्या नोंदी व जातीचे प्रमाणपत्र, जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता त्यांनी होलार समाज सामाजिक संस्थेसी संपर्क साधावा. वरील अडचणीमुळे होलार समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता आलेला नाही. होलार समाजाचा सामाजिक, आर्थिक, व सर्वागीण विकास व्हावा शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा जातीचे प्रमाणपत्र जातीचे वैधता प्रमाणपत्र विशेष मोहीम राबवून देण्यात यावा तसेच होलार समाजाला येणार्या अडचणी शैक्षणिक बाबीकडे झालेले दुर्लक्ष व शिक्षणातील गळतीचे प्रमाण, जातीचे अस्तित्व, जातीच्या चुकीच्या नोंदी संदर्भात तसेच स्त्रियांचे स्थान होलार व होलेर माताग सुतार ,धनगर या मधील अडचणी होलार समाजाला जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणार्या अडचणी शासकीय योजनेचा माहितीचा अभाव तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजनेची माहिती तळागाळापर्यंत पोहोचली जात नाहीये शिक्षणाचा अभाव उत्पन्नाच्या साधनांचा अभाव रूढी परंपरेचा पगडा व समाजातील आर्थिक दुर्बल लोकांसाठी ठोस अश्या उपाययोजना नाहीत, वेळेवर उपचार, सरकारी मदत उपलब्ध होत नाही, अत्याचार ग्रस्त समाज बांधवांना योग्य तो न्याय मिळत नाही. हे होलार समाजाचे मूलभूत प्रश्न आहेत व हेच प्रश्न सोडवण्यासाठी होलार समाजाचे प्रेरणास्थान श्री भगवान हरिबा जावीर गुरुजी व दत्तात्रय करडे संस्थेचे प्रवक्ते बबन करडे संस्थेचे सल्लागार अर्जुन खांडेकर सचिव जगन्नाथ पारसे खजिनदार तसेच सर्व सदस्य यांच्या सहकार्याने हे प्रश्न सोडवले जात आहेत याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी. आपला विश्वासू श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष.
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-