होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी वेळ दुपारी बारा वाजता संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या अथक प्रयत्नाने रोहिदास चर्मोउद्योग विकास महामंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन बार्टी सोलापूर येथे सामाजिक व सांस्कृतिक न्याय भवन येथे सौ. बार्टीचे प्रणिता कांबळे प्रकल्प अधिकारी सोलापूर तसेच चर्मकार विकास महामंडळाचे अविनाश चाबुकस्वार अधिकारी यांच्याबरोबर बैठक संपन्न झाली . त्यावेळी संत रोहिदास चर्मोउद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना मार्गदर्शन अधिकारी यांनी केले तसेच होलार समाजातील तरुणांना उद्योगाला लागणारी अर्थसहाय्य महामंडळाच्या माध्यमातून मिळण्याकरता जास्तीत जास्त अर्ज केले पाहिजे व काही अडचणी आल्यास नामदेवराव आवळे यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान केले. तसेच बार्टीचे प्रणिता कांबळे प्रकल्प अधिकारी यांनी अतिशय महत्वाचे समाजमार्गदर्शन करुन समाज बांधवांची मनी जिंकली. तसेच समाज्यातील तरूणांना उध्योगाला लागणारे अर्थ सहाय्य कसे मिळवायचे यावर विस्तृत चर्चा करण्यात आली यावर सोलापूर येथील महामंडळाचे प्रमुख यांनी समाधान कारक मार्गदर्शन केले लवकर कसे मंजूर करता येईल आणि उधोगाला लागायचे हा मार्ग त्यांनी सांगितला आहे यावेळी होलार समाज्यातील हे मान्यवर उपस्थीत होते. श्रीरंग केंगार, तानाजीराव भडंगे, बबनराव करडे शिवाजीराव जावीर, साहेब सदाशिव ऐवळे, रघुनाथ ऐवळे, विट्ठल गेजगे, सिताराम ऐवळे, महादेव पारसे, जगनाथ पारसे, वगसिद्ध गायकवाड आदी मान्यवर उपस्थीत होते तसेच होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य ही संस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच बैठका घेऊन समाज बांधवांना जास्तीत जास्त अर्थसहाय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे त्याचा लाभ सर्व समाज बांधवांनी घ्यावा ही नम्र विनंती आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे संपर्क ९७६४९६९०७४
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-