https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/ डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण बार्टी पुणे महाराष्ट्र शासन व होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या स्व॑युक्त विद्यमाने होलार समाजाचे प्रेरणास्थान भगवान हारीबा जावीर गुरुजी व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव यांच्या अथक प्रयत्नामुळे इतिहासात प्रथमच नाशिक प्रशासिक विभागातील पाच जिल्हे, धुळे, नंदुरबार, जळगाव ,अहमदनगर, या जिल्ह्यातील वंचित होलार समाजाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी एक दिवशीय विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे .दिनांक 26/ 9/ 2023 ्रोजी सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजून ३० मी.या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन समाज कल्याण नाशिक या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक, या कार्यशाळेमध्ये उपस्थित प्रशिक्षणार्थ यांना महसूल विभागामार्फत जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी ची प्रक्रिया अडचणी या विषयावर मार्गदर्शन जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र साठी प्रक्रिया मार्गदर्शन तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजना बार्टीच्या योजना या विषयावर मार्गदर्शक करण्यासाठी विविध संबंधित विभागांना आमंत्रित करण्यात आले आहे तरी आपण नाशिक प्रशासिक विभागातील पाच जिल्ह्यातील होलार समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सचिव अर्जुन खांडेकर व जगन्नाथ पारसे साहेब यांनी केले आहे. आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव आयवळे पुणे
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-