Thank you for your message. We're unavailable right now, but will respond as soon as possible. Follow me please http://www.holarsamajsamaiksanstha.blogspot.com http://www.holarsamajssp.blogspot.com महाराष्ट्रातील तमाम होलार बंधू आणि बहिणींना अतिशय नम्रपणे आवाहन करण्यात येते की आपला भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून ते आज अखेर होलार समाजाचा एक ही प्रश्न सुटलेला नाही त्याला अनेक कारणे असूशक्ततात. परंतु होलार समाजाचे प्रेरणास्थान श्री भगवान हरीबा जावीर गुरुजी व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या अथक प्रयत्नामुळे होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेली नोंद व त्यामुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता होत असलेल्या अडचणी गेली अनेक वर्षे पासून भेडसावत आहेत त्या सोडविल्या जातील संस्थेसी संपर्क साधावा परंतु आपण स्वतः जिल्ह्याच्या ठिकाणी प्रोसेस करावी न दाखला मिळाल्यास जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची प्रत पावती संस्थेला पाठवावी कारण आम्ही अपर जिल्हाधिकारी तथा विभाग प्रमुख प्रशिक्षण विभाग, बार्टी पुणे व सहा. आयुक्त समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद गट विकास अधिकारी व उपविभागी अधिकारी व तहसीलदार महसूल विभाग यांच्याशी समन्वय साधून आपले प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे याची नोंद समाज बांधवांनी द्यावी होलार समाज सामाजिक संस्था पुणे आपला विश्वासू नामदेवराव श्रीरगअयवळे संपर्क नंबर 97 64 96 90 74 या नंबर वर संपर्क साधावा
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-